राज्यात उद्यापासून (दि. १४ एप्रिल) १ मे पर्यंत संचारबंदी लागू – मुख्यमंत्री

मुंबई (प्रतिनिधी): राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधले आहेत.कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनाची ही साखळी मोडण्यासाठी मुख्मंत्र्यांनी कडक निर्बंध जाहीर केले आहेत. उद्या रात्री 8 वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चालू राहणार मात्र त्या केवळ अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी चालू राहणार.

सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सार्वजनिक वाहतूक सुरू, कारण नसताना घराबाहेर पडल्यास कारवाई होणार, उद्या रात्री 8 वाजल्यापासून निर्बंध लागणार, लॉकडाऊन सदृश्य निर्बंध आहेत- उद्या रात्री ८ वाजल्यापासून अंमलबजावणी, उद्या रात्रीपासून ब्रेक द चैनसाठी राज्यात संचारबंदी, पुढील १५ दिवस संचारबंदी, येणे जाणे पूर्ण बंद, आवश्यक काम नसेल तर घराबाहेर पडायचे नाही, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद, सार्वजनिक वाहतुक म्हणजे लोकल, बस व्यवस्था सुरू राहणार, त्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी वापरले जाणार, वैद्यकीय सेवा, लस उत्पादक, वैद्यकीय वाहतुक, वैद्यकीय साहित्य वाहतूक सुरू राहणार, शीतगृह, जनावरांचे दवाखाने, शेतीची कामे सुरू राहतील, बँका, आर्थिक संस्था,  अधिस्वीकृती धारक पत्रकार सुरू राहणार, बांधकाम साईट सुरू राहणार, तिथे काम करणारे कर्मचार्‍यांची तिथेच राहण्याची व्यवस्था करण्याची अट, हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद, मात्र होम डिलिव्हरी सुरू राहणार, रस्त्यावरील खाद्यपदार्थ सेवा सुरू राहणार,  लाभार्थीना ३ किलो गहु आणि दोन किलो तांदुळ एक महिना मोफत, सात कोटी लोकांना मोफत धान्य !

Loading