राज्यात 1 लाख कोरोनाबाधित, 3500 हून जास्त दगावले तरी उघडल्या काही शाळा

मुंबई: देशात लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढला आहे. देशात गेल्या 24 तासांत 10956 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.या पार्श्वभूमीवर अनेक राज्यात पुन्हा लॉकडाऊनचे नियम कठोर करण्याची तयारी सुरू झाली आहे.

महाराष्ट्र सरकार देखील लॉकडाऊनबाबत विचाराधीन आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्येत मोठी वाढ झाली आहे. दिवसागणिक रुग्ण वाढत आहेत. राज्यात जळपास एक लाख नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 3500 हून जास्त रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे. तरी देखील महाराष्ट्रात काही ठिकाणी शाळा उघडण्यात आल्या आहेत.

देशभरात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यांपासून शाळा बंद आहेत. 16 मार्चपासून बंद करण्यात आलेल्या शाळा आता पुन्हा उघडण्यात आल्या आहेत. दरम्यान, अद्याप शाळेत विद्यार्थी येत नाही आहेत. प्रशासकीय कामांसाठी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी शाळेत येत आहेत. यामुळे कोरोना व्हायरस आणखी पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

‘टाइम्सनाऊ’ ने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यातील शाळा उघडण्यात आल्या आहेत. शिक्षकांना आठवड्यातून किमान दोन-तीन दिवस काम करण्यात प्रशासनानं आदेश दिले आहेत. शिक्षकांना सॅनिटायजर आणि मास्क बाळगण्यास सांगण्यात आलं आहे. ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध असतानाही शिक्षकांना शाळेत यावे लागत आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता आहे. शिक्षकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत.

Loading